काजूसारखा आकार असणाऱ्या किडनीचे आपल्या शरीरात एक विशेष महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात आपण जो आहार घेतो त्यानुसार आपल्या रक्तात विविध रसायने आणि पोषक तत्वे मिसळली जातात. रक्तातील घातक आणि विषारी घडक शरीराबाहेर काढण्याचे आणि शरीर शुद्ध ठेवण्याचे एक महत्त्वपूर्ण काम किडनी करत असते. किडनीचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे असते. या लेखात आपण किडनीचे कार्य कसे चालते आणि किडनीच्या आरोग्यासाठी काय करावे याची माहिती घेणार आहोत.
किडनीचे कार्य म्हणजे आपल्या शरीरातील रक्तात नको असलेल्या पदार्थांचे मूत्रात रूपांतर करून ते शरीराबाहेर टाकणे. याशिवाय किडनीद्वारेच शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखली जाते. जसे हृदय सतत कार्यरत असते त्याचप्रमाणे किडणीही सतत कार्य करत असते.
शरीरात सतत विषारी किंवा नको असलेले पदार्थ तयार होत असतात. या पदार्थांना मूत्रावाटे बाहेर काढणे, शरीरातील वाढलेल्या पाण्याची पातळी कमी करणे, आम्ल आणि क्षार जसे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फ रस, बायकार्बोनेट वगैरेचे संतुलन राखणे यांसारखे महत्त्वाचे कार्य किडनी करत असते.
किडनी अनेक संप्रेरके (हार्मोन्स) तयार करत असते. ज्यात एंजियोटेन्सीन, एल्डोस्टोरेन, प्रोस्टागेल्डीन इत्यादींचा समावेश असतो. या संप्रेरकांच्या मदतीने शरीरातील रक्तदाब नियंत्रित केला जातो.
आपल्या शरीरातील लाल रक्त पेशी एरीथ्रोपेएटीनच्या मदतीने अस्थिमज्जामध्ये निर्माण होत असतात. हे एरीथ्रोपेएटीन संप्रेरक किडणीत तयार होत असते. जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा एरीथ्रोपेएटीन तयार होणे कमी तरी होते किंवा पूर्णपणे बंदही होते. यामुळे शरीरात रक्त बनणे बंद होते आणि ॲनिमिया (रक्ताची कमतरता) होऊ शकतो.
आपल्या सर्वांना माहित आहेच व्हिटॅमिन डी (ड जीवनसत्व) हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचे असते. किडनी शरीरातील हे व्हिटॅमिन डी बनवण्याचे कार्य देखील पार पाडत असते.
एका वयस्क माणसामध्ये किडनी १० सेमी लांब, ५ सेमी रुंद आणि ४ सेमी जाड असते. एका किडनीचे वजन साधारण १५० ते १७० ग्रॅम दरम्यान असते. किडनी आणि मूत्राशयाला जोडणारी एक नळी असते जिला मूत्रवाहिनी म्हणतात. ही मूत्रवाहिनी अंदाजे २५ सेमी लांबीची असते. किडनीने फिल्टर केलेले पदार्थ मुत्राच्या रुपात या नलिकेतून मूत्राशयात पाठवले जातात आणि तिथून पुढे शरीराबाहेर काढून टाकले जातात.
किडनी हा आपल्या शरीरातील किती महत्त्वाचा अवयव आहे हे आता आपल्या लक्षात आलेच असेल. आपले संपूर्ण आरोग्य या किडण्यांवर अवलंबून असते त्यामुळे यांची विशेष काळजी घेणे हे आलेच. आपल्या चुकीच्या सवयी किडनीची कार्यक्षमता कमी किंवा निकामी करू शकतात.
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला आहार. गाडीला जसे पेट्रोल किंवा डिझेलची गरज असते तशीच गरज आपल्याला अन्नाची असते. अन्न हे आपल्या शरीरासाठी इंधनाचे कार्य करत असते. याचाच अर्थ आपल्याला योग्य आणि पौष्टिक आहार घेण्याकडे भर दिला गेला पाहिजे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेतच. धावपळीच्या बरोबरीने ‘फास्ट फूड’ खाण्याचे प्रमाणही वाढले आहे परंतु हेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. Health Is Wealth अर्थात आरोग्यम् धनसंपदा हे न विसरता आरोग्याच्या दृष्टीने जे महत्वाचे आणि पोषक आहे त्याच खाद्य पदार्थांचे आपण सेवन केले पाहिजे.
यात फळे, हिरव्या भाज्या यांचा समावेश तर असतोच पण जर तुम्ही एक किडनी रुग्ण असाल तर पोटॅशियम, प्रोटीन आणि मीठ यांचे सेवन कमी केले पाहिजे.
किडनीचे नुकसान होऊ नये यासाठी अननस, पेरू, पपई, नासपती यांसारख्या फळात काही अँटीऑक्सीडन्ट असतात त्यामुळे आहारात या फळांचा समावेश करायला हवा. पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश केल्याने किडनीला दीर्घकाळ लाभ मिळतो. रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर युक्त पदार्थांचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा.
पाण्याला जीवन म्हणतात. पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला सांगण्यात येत असतात. किडनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी पाणी मोलाचे सहकार्य करू शकते. जर तुम्ही किडनीचे रुग्ण असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी पिणे उचित असेल.
तज्ज्ञांच्या मते निरोगी माणसाने दिवसभरात साधारण २.५ ते ३ लिटर पाणी प्यावे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी जर दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिले तर किडनीचे कार्य अधिक सुधारते. पाण्यामुळे किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास सोपे जाते.
किडनी समस्या निर्माण होण्याची मुख्य कारणे म्हणजे अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब. ज्या व्यक्तींना मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजारांची समस्या असते त्यांनी किडनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
काही वेळा चेहऱ्यावर सूज, पोटदुखी अशी लक्षणे दिसूनही त्याकडे कानाडोळा केला जातो आणि वेळ निघून गेल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते. कधीकधी तपसण्या करण्यात हलगर्जीपणा करणे देखील याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे किडनीचे आरोग्य नेहमी संतुलीत ठेवण्यासाठी वेळच्यावेळी तपासण्या करणे गरजेचे असते.
जर तुमच्या कुटुंबात आधीच कोणाला हाय ब्लड प्रेशर, मधुमेह (डायबिटीस), किडनीचे विकार असे काही आजार असतील तर तुम्ही नियमित किडनीची तपासणी करणे लाभदायक ठरते. कमीतकमी सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा किडणीच्या तपासण्या जरूर कराव्यात.
पाठदुखी, पोटदुखी, सूज येणे, भूक न लागणे अशी सामान्य लक्षणे जरी दिसत असली तरी एकदा किडनीच्या तपासण्या करून घ्याव्यात. आजार बळवण्याच्या आत जर त्याचे निदान झाले तर नक्कीच भविष्यात होणारे वाईट परिणाम काही अंशी कमी करता येतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचण्या (Blood Test), मूत्र चाचण्या (Urine test) करत राहिल्याने डॉक्टरांना योग्य वेळीच आजाराचे निदान होते आणि त्यामुळे त्यानुसार पुढची ट्रीटमेंट ठरवल्याने किडनीची काळजी घेता येते.
योग्यवेळी तपासण्या केल्या गेल्या नाहीत तर गंभीर स्वरूपाच्या आजारात किडनी पुन्हा पहिल्यासारखी होणे असंभव होते. यामुळे किडनीचे कार्य कमी होते आणि जिवावरही बेतू शकते.
जेव्हा किडनी खराब होते तेव्हा जास्तीचे द्रव्य फिल्टर करण्याची क्षमता कमी होते आणि यामुळे रक्तातील विषारी घटक शरीराबाहेर काढले जात नाहीत आणि शरीरात फिरत राहतात. यामुळे थकवा येणे, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या, हाडे कमकुवत होणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.
परिस्थिती हाताबाहेर गेली असल्यास किडनी प्रत्यारोपण किंवा डायलिसिस यांशिवाय पर्याय नसतो त्यामुळे वेळीच आजाराचे निदान करून त्यावर उपाय करणे श्रेयस्कर ठरते.
जर तुम्हालाही काही समस्या भेडसावत असतील आणि तुम्ही चांगल्या युरोलोजिस्टच्या शोधात असाल तर डॉ. निनाद तांबोळी हे वाशी, नवी मुंबई येथे त्यांची प्रॅक्टिस करतात त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. त्यांची प्रोफेशनल आणि अनुभवी टीम प्रत्येक रुग्णाची त्यांच्या त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार योग्य सल्ला आणि चांगली काळजी घेतात.
आता आपल्या लक्षात आलेच असेल किडणीचा आकार जरी काजू सारखा असला तरी किडनीचे कार्य मात्र महान आहे. किडनीचे आरोग्य निरोगी ठेवणे हे आपल्या संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. याच सगळ्यात महत्त्वाच्या अवयवाच्या सुरक्षेसाठी किंवा किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सहा टिप्स:-
किडनी आपल्या शरीरातील एक खूप महत्त्वाचा अवयव आहे. किडनीची काळजी घेण्यासाठी पौष्टिक आहार घेणे, तपासण्या करत राहणे, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे यांसारखे काही साधे सोपे उपाय करावे. तुमची किडनी जर थोड्याच प्रमाणात खराब झाली असेल तर ती पुन्हा पूर्ववत होऊ शकते किंवा अजून नुकसान होऊ नये म्हणून त्यानुसार डॉक्टर ट्रीटमेंट देतात पण जर हा आजार गंभीर झाला असेल तर किडनी पुन्हा पूर्ववत होत नाही. हे टाळण्यासाठी जर तुमच्या कौटुंबिक इतिहासात कोणाला मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार असतील तर तुम्हीही सावध राहून वेळोवेळी तपासण्या करत राहिले पाहिजे.
Free Consultation Book Now
About The Urology Clinic Navi Mumbai
The Urology Clinic Navi Mumbai, led by Dr. Ninad Tamboli, a trusted urologist in Navi Mumbai, is your destination for expert urological care. Specializing in advanced treatments for urinary and reproductive health.
We’re here to assist you! Reach out to us for appointments, inquiries, or detailed information about our services: